Aamhi ShabdaBhramar

Friday, December 23, 2005

विझली वात

उरला हा दिवस कधी नाही कशात
सरले क्षण असे आतल्या आत
लपवून सारे कसे, जाळू या स्मृतींना
गुदमरून जातो जीव, त्यांच्या धुरात

नव्हते जे माझे, असे काही गमावले
तोरण आठवणींचे दारा, मनाच्या लावले
दूर जाण्याचाही मी केला सण साजरा
बडवून ढोल-नगारे, ह्या माझ्या उरात

दिवसाला आता थांबवणे नाही
पावसाला पुन्हा नाही बोलावत
उडवून चार शब्द, दहाहीं दिशांना
गातो कहाणी मी, विरल्या सूरांत

-
केतन

0 Comments:

Post a Comment

<< Home